ईडीची मोठी कारवाई! जळगावातील प्रसिद्ध आरएल समूहाच्या राज्यभरातील ३१५ कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई । जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईत मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी आहे.
ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील मालमत्ताचा समावेश आहे. १३ ऑक्टोबर रोजी पीएमएलए, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली असल्याची माहिती ईडीने दिली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जळगावसह राज्यातील इतर भागात मालमत्ता जप्तीची कारवाई ईडीतर्फे करण्यात आली. जळगावातील राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीकडून ३१५ कोटींच्या ७० स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
सीबीआयने काही महिन्यापूर्वी गुन्हे दाखल केले होते. त्या आधारावर ईडीकडून मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरू होता. या तपासात मनी लाँन्ड्रिंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर १८ ऑगस्ट २०२३ रोजी ईडीने जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर छापा टाकला होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दागिने व रोकड जक्त करण्यात आली होती. यावेळी काही मालमत्ता या सिल सुद्धा करण्यात आल्या होत्या. यांनतर आता ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ७० स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत.