राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड

0

मुंबई । महायुतीला महाराष्ट्रात अभूतपूर्व विजय मिळाला. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजय मिळवला असून महायुतीच्या त्सुनामीत मविआ चारीमुंड्या चीत झाली आहे. आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले असून सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधीदेखील होण्याची शक्यता आहे. यातच आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड करण्यात आहे.

थेट बँक खात्यात महिना १५०० रुपयांची ओवाळणी जमा करणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीचा सारा खेळ खल्लास केल्याचे स्पष्ट चित्र आहे. या निवडणुकीत महिलांच्या मतदानात ७ टक्के वाढ झाली आणि हे बहिणींच्या मतांचे दान थेट महायुतीच्या पदरात पडले. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा देत महायुतीने दिलेली हिंदू एकजुटीची हाकदेखील राज्यभर मोठा परिणाम साधणारी ठरली.

परिणामी, १४५ हा बहुमताचा जादुई आकडा मागे टाकत महायुतीने थेट २३५ जागांवर झेप घेत आपली सत्तेवरची पकड मजबूत केली. यात १३२ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने आजवरचा सर्वाधिक जागांचा उच्चांक नोंदवला. खालोखाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ आमदार निवडून आणले.

Leave A Reply

Your email address will not be published.