अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता व्हावी या मागणीसाठी रिजनल टीचर ऑर्गनायझेशन यांच्यावतीने उपोषण
चिपळूण (ओंकार रेळेकर)संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद होण्याच्या प्रमुख मागणीसाठी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर लाक्षणीक एक दिवसाचे साखळी उपोषण केले जाणार आहे. याची सुरुवात रत्नागिरी येथुन आज गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी लाक्षणीक एक दिवसाचे साखळी उपोषण केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रवीण किणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय जवळ एक दिवसाचे लाक्षणीक साखळी उपोषण केले जाणार असून या उपोषणानंतरही शासनाने दखल न घेतल्यास शिक्षकांच्या मागण्या संदर्भात मंत्रालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे .शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही एकत्र येऊन रीजनल टीचर्स ऑर्गनायझेशनची स्थापना केली आहे अशी माहिती रिजनल टीचर ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद ,राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
आमच्या संघटनेची स्थापना मार्च २०२४ रोजी झाली असून याची विचार प्रणाली ही शिक्षकांचा सन्मान व हक्क मिळावा यासाठी प्रयत्न करणे आहे व एज्युकेशन क्वालीटी वाढावी ही आहे तसेच शिक्षकांची अशैक्षणिक कामासाठी नेमणूक केली जाते या विरोधात लढा देण्यासाठी संघटनेची स्थापना झाली आहे.
शिक्षकांमध्ये बरेच वर्षापासून वाद सुरू आहेत ते म्हणजे इलेक्शन ड्युटी पासून सर्वे पर्यंत प्राथमिक, माध्यमिक, अनुदानित, विनाअनुदानित व सर्व प्रकारचे शिक्षक या कामात गुंतवले जातात याचा परिणाम विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होण्यावर होतो. हा जादा कामाचा वेळ कमी करून शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी वेळ मिळावा यासाठी व शिक्षणातील गुणवत्ता वाढण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाकडे आमची मागणी आहे की अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांना विमुक्त करून विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे जास्तीत जास्त लक्ष कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावेत. चांगल्या प्रतीचे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना कसे मिळेल याकरिता शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे असे संजय काशीद म्हणाले.शिक्षकांना अशैक्षणिक कामासोबतच ऑनलाइन पद्धतीची कामे सांगितली जातात अशा वेळी नेटवर्क नसते शिक्षकांना स्वतःचे मोबाईल वापरावे लागतात या कामात जादाचा वेळ दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षकांचा वेळ कमी होतो
त्यामुळे शिक्षणातील गुणवत्ता पूर्णपणे ढासळते तसेच शिक्षकांना अभ्यास करण्यासाठी जो वेळ हवाय तो कमी मिळतो. अशावेळी शासनाने त्यांना कॉम्प्युटर, मोबाईल उपलब्ध करून द्यावेत त्या माध्यमातून ते शाळेचे कामकाज पूर्ण करू शकतील त्यातून शिक्षकांना मुलांसाठी ज्यादा वेळ देणे शक्य होईल यातून शैक्षणिक गुणवत्ता वाढेल त्यामुळे अशैक्षणिक कामातून शिक्षकांना बाजूला करणे गरजेचे आहे. आमची ऑर्गनायझेशन विद्यार्थी, पालक, सर्व स्तरातील शिक्षक, अनुदानित विनाअनुदानित शिक्षक, कायमस्वरूपी शिक्षक, अर्थसहायीत शिक्षक अशा सर्व प्रकारच्या शिक्षकांना एकत्र करून ही संघटना पुढे चालली आहे. योग्य मार्गाने योग्य मार्गदर्शन आणि न्यायासाठी हक्कासाठी आम्ही अशा पद्धतीने शासनाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तरी सर्व शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले जावे व यावरती योग्य पद्धतीने लवकरात लवकरच निर्णय मिळावेत शिक्षकांना मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देता यावे याकरिता शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता व्हावी ही आमची एकमेव मागणी असल्याचे रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद यांनी येथे बोलताना सांगितले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष भरत पाटील, संजय जाधव, सुमित वासनिक, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय खटके, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख आशिष देशमाने, रत्नागिरी जिल्हा समन्वयक ललित कांडविलकर ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.