चाळीसगाव हादरले! चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील हातगाव गावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय.
वर्षा विजय चव्हाणके (३८) आणि विजय चव्हाणके(४५) असे मयतांची नावे आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे हातगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विजय चव्हाणके हा पत्नी वर्षा व मुले तसेच आई यांच्यासह हातगाव शिवारात राहत होता. त्याचे गेल्या दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे त्याचे आणि पत्नीचे कौटुंबीक कारणातून वाद होत असे. यातून तो पत्नी वर्षा यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत असे. सोमवारी सकाळी ११.२५ वाजेच्या सुमारास विजय याने मोठा भाऊ अशोक सुकदेव चव्हाणके यांना फोन करून मी पत्नी वर्षाला संपवले असून तोसुद्धा बरेवाईट करणार असल्याचे सांगितले. या घटनेने हादरलेल्या अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय व त्याची पत्नी वर्षा यांच्या शोधासाठी शेतात धाव घेतली असता शेताच्या मध्ये असलेल्या बांधावरील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
तर त्याची पत्नी वर्षा शेतातील गुरांच्या चाऱ्यामध्ये जमीनीवर मृत अवस्थेत आढळून आली.तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. सावरगाव असे मृतांची नावे आहेत. ही घटना सोमवार २ रोजी सकाळी ९.३० ते ११.४५ वाजेच्या दरम्यान मृत विजय चव्हाणके याच्या शेतात घडली. याप्रकरणी मृत पतीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लहान भाऊ विजय सुकदेव चव्हाणके याने त्याची पत्नी वर्षा विजय चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा दोरीने गळा आवळून खून केला व विजय याने स्वतः सुद्धा शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी फिर्याद मोठा भाऊ अशोक सुकदेव चव्हाणके पोलिसांत यांनी दिली.