गोठ्याला भीषण आग, सहा गुरांचा होरपळून मृत्यू ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

0

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गुरांच्या गोठ्याला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सहा गुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला; तर तीन गुरे जखमी झाले आहे. तसेच तीन ट्रॅक्टर व अन्य शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले

बेलसवाडी येथील शेतकरी धनराज प्रजापती यांचे गोठड्यात ही आग लागली आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं आहे. ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला हा मोठा फटका बसला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकरी धनराज प्रजापती यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुरली दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या मदतीने आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणली. मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्याला काही मदत मिळेल का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.