मुंबई । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे, असं मोठं वक्तव्य करत रामदास आठवलेंनी आरपीआयचे नेतृत्व सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी त्यांनी विधानसभेच्या जागा वाटपावरुनही महायुतीला मोठा इशारा दिला आहे.
आरपीआय नेते रामदास आठवले यांनी साताऱ्यात मोठं विधान केले आहे. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी विधानसभेच्या जागा वाटपावरुनही महायुतीला मोठा इशारा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला 8 ते 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी करत महायुतीमध्ये आम्हाला गृहीत धरून काम करू नका, असा मोठा इशाराही दिला. तसेच राज्यात महायुतीच्या 170 चा पुढे जागा निवडून येतील’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अमित शहा यांनी समान नागरी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी सहमती दर्शवली. अमित शहा यांनी समान नागरी कायदा आणणार असं विधान केलं आहे त्याबाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी कायदा आला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.