हंगामी पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज पाठविण्याचे आवाहन

0

जळगाव | कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी, नाले तसेच तापी नदी वरील मंजूर उपसा सिंचन योजना ह्यांचा पाण्याचा फायदा घेणारे तमाम बागाईतदारांना कळविण्यात येते की, दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीत करीता दि. 1 जुलै, 2025 पासून सुरु होणारा खरीप हंगाम 2025 मध्ये भुसार अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी , भुईमुग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं.7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 31 ऑगस्ट, 2018 पर्यंत सायंकाळी 17-45 वाजेपर्यंत देण्यात यावे.

पाणी अर्ज स्विकारण्याच्या शर्ती-
पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल, बागायतदारांनी आपआपल्या शेतचा-या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी / ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा 10% जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश/पाळी नसतांना पाणी घेणे मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल, टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पिक नुकसान भरपाई देता येणार नाही. जाहिर निवेदना मध्ये नमूद केलेल्या विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्दी करण्यात येईल. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहीरी बाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. असे कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.