जळगाव, भुसावळ मार्गे देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरू

0

जळगाव । देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईला मिळाली ती लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून सहरसा दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये या ट्रेनचे उद्घाटन केले होते. विशेष या ट्रेनला जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त, ही रेल्वेगाडी मुंबई ते बिहार दरम्यान जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देते.

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते सहरसा दरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे. सहरसा – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई अमृत भारत एक्स्प्रेस दिनांक २५.०४.२०२५ रोजी मध्य रेल्वेत १६.१५ वाजता खंडवा येथे पोहोचली आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मध्यरात्रीनंतर पोहोचण्याची शक्यता आहे. ट्रेन क्रमांक 11015 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक ०२.०५.२०२५ पासून दर शुक्रवारी १२:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०२:०० वाजता सहरसा येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 11016 सहरसा दिनांक ०४.०५.२०२५ पासून दर रविवारी ०४:२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५:४५ वाजता पोहोचेल.

अमृत भारत एक्सप्रेस कुठे कुठे थांबणार ?
ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, मिर्जापुर, पं.दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, सोनपुर, हाजीपुर जंक्शन, मुज़फ्फरपुर, समस्तीपुर, हसनपुर रोड, सलौना आणि खगड़िया जंक्शन

ट्रेनमध्ये किती आणि कोणते डब्बे असतील?
०८ शयनयान क्लास, ११ सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार आणि ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन

Leave A Reply

Your email address will not be published.