राज्यात काही महिन्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशी चर्चा सर्वत्र आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती सरकारकडून योजनांची घोषणा करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवरून सरकारला घेरले जात आहे.
अशात आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर अजित पवार नुकतेच आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार राज्यभरात जनसंवाद यात्रा काढत आहे.यासोबतच ते पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत येत्या विधानसभेच्या निमित्याने बैठक पार पाडत आहे. यावेळी अजित पवार म्हणाले,’जिथे जिथे तिथे उमेदवार मागच्या वेळी निवडून आले होते तिथे-तिथे आम्ही जातोय. आज काटोल आणि नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी वितरण करणार आहे. उद्या वरुड मोर्शी पुसद याठिकाणी आम्ही जाणार आहोत.’
ते पुढे म्हणाले,’आतापर्यंत आमचा एक राऊंड झालेला आहे. आम्ही सर्वच एकत्रपणे निवडणूक लढणार आहोत. साधारणता 288 मतदार संघाचा विचार करून एकमत करू. ज्यावेळी जागा निश्चित होतील. त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू, इलेक्टिव्ह मेरिट निकष आहे”, असं म्हणत अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
कुणी काहीही टीका केली तरी मला काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी कामाचा माणूस आहे आणि अर्थसंकल्पातून सर्व समाजाला जनतेला चांगले देण्याचं काम केलं आहे.’ असंही अजित पवार म्हणाले.