अमळनेरच्या दाम्पत्यावर “संक्रात”; ट्रॅव्हल्सचा अपघात अन् जोडप्याचा मृत्यू
अमळनेर । मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहे. मयतात दोघे अमळनेरचे आहेत
यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला.
यामध्ये पियुष पाटील आणि वृंदा पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पियुष मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होता, तर वृंदा उच्चशिक्षित असून माहेर असलेल्या बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती.त्यांच्या दुर्दैवी निधनाने मारवड गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या अपघातातील जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.