महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत राज्याच्या निकालाबाबत माहिती दिली.त्यानुसार या परीक्षेत दरवर्षीप्रमाने यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहायला मिळणार आहे.
कोकण विभागाने ९८.८२ टक्केवारीसह याही वर्षी १० वीच्या निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ आहे. तर मुलांचा उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९२.३१ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे इयत्ता १० वीच्या परीक्षेत यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे.
यंदा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला
यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.९१ टक्के होती. या तुलनेत यंदा निकाल१.७१ टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी २०२३ च्या तुलनेत थोडी वाढली होती. पण ती यंदा पुन्हा घटली आहे. २०२३ मध्ये, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ टक्के होती, जी २०२२ च्या तुलनेत ३.१८ टक्क्यांनी कमी होती.
या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org