रस्त्यांसाठी नागरिकांनी घेरले अभियंत्याला; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

जळगाव |जळगाव शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीमधून जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून टेंडरही काढण्यात आले आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी खोदकाम व मुरूम टाकण्यात येऊन नागरिकांचे हाल होत आहे. त्यासाठी त्या ठिकाणी रस्ते व्हावे यासाठी आज कांचन नगर मधील माजी नगरसेविका व नागरिक थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले व त्वरित रस्ता करण्याची मागणी त्यांनी केली. तर याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला.

महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर शंभर कोटीचा निधी तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरासाठी मंजूर केला होता. या डीडी मधून जळगाव शहरातील अनेक प्रभागांमधील रस्त्यांची आखणी व मंजुरी करून टेंडरिंग करण्यात आलेले आहे. अशाच प्रभाग क्रमांक 2 अ रस्त्याचे काम सुरू करण्यात आले त्या ठिकाणी खोदकाम करून मुरमुही टाकण्यात आला मात्र गेल्या एक-दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही अशी नागरिकांनी ओरड केली. त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेतली व काम काम होत नाहीये या प्रभागातील रस्ते तयार करण्यात का येत नाहीये याबाबत विचारणा केली.

याबाबत अपर जिल्हाधिकारी यांना कांचन नगर मधील नागरिकांनी निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी या रस्त्याचे कामकाज पंधरा दिवसात सुरू करावे असेही त्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनवणे यांनी नागरिकांची समजूत काढत नागरिकांना सांगितले आहे की, त्या रस्त्याचे काम करण्याचा कालावधी दोन वर्षांचा आहे . आमच्या वर खूप प्रेशर आहे व ठेकेदारांचे 17 ते 18 कोटी रुपये बिल बाकी आहे. त्यामुळे त्यांना ते बिल मिळणार की नाही मिळणार म्हणून अनेक ठेकेदारांनी कामे बंद केले की त्यांनी नागरिकांना सांगितले मात्र याबाबत संबंधित ठेकेदाराला फोन करून त्यांनी त्या तिथेच जाऊन व संबंधित माझे नगरसेविकांसमोर ते कामाची पाहणी करून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.