एरंडोलमध्ये टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

0

एरंडोल । एरंडोनजीक भीषण अपघात झाला असून यात भरधाव टँकरने दुचाकीस जबर धडक दिल्याने दोन जण ठार झाले आहे. राजू भिला भोई (४६, रा. एरंडोल) आणि दीपक रामकृष्ण मोरे (वय ३४, रा. शिरसोली ता. जळगाव) अशी मृतांची नावे असून ते साडूभाऊ होते. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी यावेळेला आपल्या भावना मांडून महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

राजू भोई यांच्या पुतणीला रविवारी हळद लागली. सोमवारी तिचा विवाह होणार आहे. दरम्यान, रविवारी रात्री राजू भोई व दीपक मोरे घराकडे जात असताना महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. टँकरने (क्र.एम.एच १९/बी.पी. २००३) धडक दिल्यावर राजू भोई हे जागीच ठार झाले तर दीपक हे जखमी झाले. त्यांना लागलीच एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टँकर पारोळा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

घटनेची एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान लग्न घरामध्ये शोककळा पसरल्यामुळे एरंडोल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. न्हाईचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. याआधीही याच ठिकाणी महामार्ग क्रॉसिंगवर अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.